कोकणातल्या गोष्टी सांगताना भूतावळ बाहेर येणं साहजिकच आहे. या गोष्टींवर विश्वास ठेवणे न ठेवणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. अगदी स्वत:ला असा एखादा अनुभव आला तरीही त्यावर विश्वास ठेवणं कठीण असतं. विशेषतः हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या बऱ्याच लोकांना हे अनुभव येतात आणि विशेष म्हणजे त्यांना ते सहन करण्याची आणि नेहमीचा जीवनक्रम चालू ठेवण्याची क्षमताही असते.