बऱ्याच काळानंतर चार वर्षांपूर्वी गणपति साठी गावात आलो तेंव्हा आईची तब्येत बरीच खालावली होती. तिची इच्छा होती की तिचे शेवटचे दिवस गावातच जावेत. मला धड चहा सुद्धा करता येत नाही जेवणाची तर बातच सोडा. मुळातच आमच्या वाडीत अगदी मोजकी माणसं आणि वाडी गावापासून बरीच दूर असल्याने जेवण करायला किंवा अन्य कामासाठी माणूस मिळणं कठीण होतं.