कोकणातल्या गोष्टी सांगताना भूतावळ बाहेर येणं साहजिकच आहे. या गोष्टींवर विश्वास ठेवणे न ठेवणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. अगदी स्वत:ला असा एखादा अनुभव आला तरीही त्यावर विश्वास ठेवणं कठीण असतं. ज्योतिष शास्त्राप्रमाणे अशा गोष्टींचा अनुभव येणं न येणं, त्यापासून काही हानी होणं इत्यादी त्या माणसाची राशी – गण वगैरेवर अवलंबून असतं असं म्हणतात. सुदैवाने मला अजून तरी मोठासा भीतीदायक वैयक्तिक अनुभव आलेला नाही. विशेषतः हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या बऱ्याच लोकांना हे अनुभव येतात आणि विशेष म्हणजे त्यांना ते सहन करण्याची आणि नेहमीचा जीवनक्रम चालू ठेवण्याची क्षमताही असते. फारच भयानक घटना घडल्या तरच त्या बाहेरच्या लोकांना कळतात.
इथे दिलेले अनुभव हे माझे व माझ्या घरातल्याच माणसांचे आहेत त्यामुळे मलातरी त्यावर विश्वास ठेवणं भाग आहे. जागा व माणसांची खरी नावं मुद्दामच इथे दिलेली नाहीत.
चहूबाजूंनी बऱ्याच अंतरापर्यंत भातशेती पसरलेली आणि वाटेतल्या छोट्याशाच माळावरच्या एकमेव झाडापर्यंत येता येता त्यांना थोडीशी चाहूल जाणऊ लागली. भांड्यांचे आवाज, फोडणीचे तळणीचे चुरचुर आवाज आणि अन्न शिजत असल्याचा घमघामट. पहाटेच्या वेळीसुद्धा भूक चाळवणाऱ्या मेजवानीच्या वासाचे कुतूहल वाटून थोडावेळ झाडाखाली थांबण्याची भावाला तिव्र इच्छा झाली. तो दुसऱ्या भावाला बोलला “बाळ्या तुका कसलो वास येता काय रे?” बाळ्याने तोंडावर बोट ठेऊन चुपचाप चालत रहाण्याची खुण केली तेव्हां त्याला त्यातील वैचित्र्य जाणवलं. उरलेली अर्धी वाट त्यांनी जवळपास धावतच पार केली. बस स्टॉपवर येताच दोघांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दुसरा पर्यायच नसल्याने त्या वाटेने नंतरही अनेकवेळा त्याचं येणं जाणं झालं. परंतु सुदैवाने पुन्हा केव्हांच असा अनुभव आला नाही.
नंतर ३-४ वर्षांनी बाबा रिटायर होऊन आईसह तिथे रहायला आले. रात्री नाऊ-साडेनऊ च्या दरम्यान ते जेवायला बसत. त्याच वेळे दरम्यान, अगदी रोज बाहेरचा दरवाजा ढकलल्याचा आवाज होई. “कोण रे?” असं विचारलं तर तर उत्तर येत नसे किंवा दरवाजा उघडून पाहिल्यावर बाहेर कुणीच नसे. हा प्रकार ते तिथे असेपर्यंत चालूच राहिला पण काही काळाने त्यांना या गोष्टीची सवय झाली आणि त्याकडे ते दुर्लक्ष करू लागले.
नंतर काही काळाने डहाणू हून आमचे स्वामीजी काही कार्यानिमित्त त्या घरात आले होते. गोष्टींच्या ओघात त्यांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं ते असं- काही अदृष्य शक्तींची येजा करण्याची वाट ठरलेली असते त्यापैकी काहींना मानव निर्मित अडथळ्याची बाधा येत नाही आणि ते आरपार ये-जा करू शकतात तर काही ती बाधा पार करू शकत नाहीत किंवा आपली वाटही बदलू शकत नाहीत. थोडक्यात घर बांधण्यापूर्वी आम्ही ती जमीन योग्य असल्याची खात्री करायला हवी होती. लवकरच आम्हाला त्यातील तथ्याची प्रचीती आली. १५ वर्षांतच ते घर हळू हळू आतून बाहेरून पूर्ण मोडकळीस आल्यामुळे आम्हाला पुन्हा दुसऱ्या जागेत नवीन घर बांधावं लागलं.
संध्याकाळी नेहमीप्रमाणे मी थोडसं जॉगिंग साठी बाहेर पडलो. झाडाजवळ पोचताच दुपारच्या प्रसंगाची आठवण झाली. तिथून स्मशानभूमी १५० मीटरवर असावी पण मधल्या टेकडीवर असलेल्या झाडाझुडपांच्या गर्दीमुळे पलीकडची स्मशान भूमी काही दिसणं अशक्य होतं. तसेच तिकडे जाणारा रस्ता सोडाच पण साधी पायवाटही नव्हती.
मला दुपारी जे काही दिसलं तो निव्वळ भास असावा किंवा गाडीच्या काचेमुळे झालेलं रिफ्लेक्शन वगैरे असावं असा विचार करून मी तो विषय सोडून दिला. पण अजूनही दुपारच्या वेळी तिथून गाडीने कधीतरी येत असलो तर मनात विचार येतो की त्या दिवशी मी जर चुकून उजव्या बाजूच्या रस्त्याला गाडी वळविली असती तर?
आमचं त्या दिवशीचं जेवण तर दहीभात केळी एवढंच होतं. खरं तर आम्ही गेली दोन वर्षांपासून मांस मच्छी खाण्याचं पूर्णपणे सोडून दिलं होतं. एवढंच काय पण गरम मसाल्याचा वापरही क्वचितच व्हायचा. थंडीचे दिवस असल्याने आजूबाजूला सर्वच घरांचे दरवाजे आणि खिडक्या पूर्ण बंद होत्या. प्रचंड थंडीमुळे तिथली घरं जवळपास एअर टाईटच बनवलेली असतात. आणि कहर म्हणजे आमच्या सभोवताली जवळपास १०० मीटरच्या परिघात फक्त गोऱ्या लोकांचीच घरं होती. तर या वासाचा उगम कुठे असावा? असे अनेक विचार भराभर मनात येऊन गेले. जवळ जवळ दीड तास त्या वासाने हैराण केलं आणि आम्ही दोघेही पूर्ण हतबल झालो होतो. तेवढ्यात अचानक कोणतीही विचित्र घटना न घडता तो वास गेल्याची आम्हाला एकदमच जाणीव झाली आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला.
कोणताही तर्क आणि स्पष्टीकरण लागू न पडणारा हा माझा एकमेव वैयक्तिक अनुभव!
हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या काही नर्सेसचा हा अनुभव आहे. रात्री १-२ च्या दरम्यान जर कुणी बाथरुमला गेलं तर कोणत्यातरी एका बाथरूम मध्ये शॉवर खाली अंघोळ चालू असल्याचा आवाज येत असे. “कोण आहे?” असं विचारलं किंवा दरवाजा वाजवला तर शॉवर बंद व्हायचा. काही वेळाने दरवाजाही उघडा दिसायचा परंतु आत कोण होतं हे कधीच कुणाला कळलं नाही न कधी कोरीडोरमधून जाताना कुणी दिसलं.
नर्सेसच्या अनेक बॅचेस तिथे येऊन गेल्या पण रात्री दोन वाजता अंघोळ कोण करायचं हे गुपित तसंच राहिलं.
रात्री पुन्हा ड्युटीवर जाताना ती अगोदर पलीकडच्या वॉर्डमध्ये तिथल्या इनचार्जला थ्यांक्यू बोलण्यासाठी गेली. तिने सर्व काही ऐकून घेतलं आणि – नो प्रॉब्लेम, यु आर वेलकम – असं काहीसं बोलली. नंतर नेहमीच्या कामात दिवस तसे चांगले जात होते. पुढे बऱ्याच दिवसांनी तिला अन्य काही नर्सेस कडून कळलं की नर्स सुशीला त्याच वॉर्डमध्ये काम करायची आणि तिला मरून बरीच वर्षे झाली होती. सुशीलाच्या सोबतीचा अनुभव अन्य काही नर्सेसनीही घेतला होता परंतु त्या वॉर्डमध्ये नवीनच ड्युटीवर जाणाऱ्या नर्सला लगेचच हे सत्य सांगून भय निर्माण केला जात नसे. आणि म्हणूनच तिकडच्या इनचार्जने विशेष काही न बोलता तिची बोळवण केली होती.
तिकडे नर्सिंग होम मध्ये सहसा कायमचं अंथरूण पकडलेले – मरणाच्या दारात असलेले असे पेशंट्स असतात. खालच्या दोन मजल्यांवर ऑफिस आणि पेशंट्स साठीचे रूम्स होते. तिथली लिफ्ट अगदी क्वचित पेशंटला वर खाली नेण्यासाठी वापरली जायची अन्यथा या दोघीं शिवाय लिफ्ट कुणीच वापरत नसे कारण आतला जिना इतरांना जास्त सोयीस्कर होता.
पहिल्या काही दिवसातच एक विचित्र गोष्ट दोघींच्याही लक्षात आली. रात्री १२-१ नंतर पहाटेपर्यंत लिफ्टचा खेळ सुरु असायचा. लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर थांबली आणि लिफ्टचा दरवाजा उघडला की पावलांचा आवाज यायचा आणि थोड्या वेळाने लिफ्ट पुन्हा खाली जायची. एखाद्या रात्री हा प्रकार ३-४ वेळा ही व्हायचा. सुरुवातीला नाईट ड्युटी नसताना कुणी एक जण झोपलेली असली तर आपली बहीण आली असावी असे समजून दरवाजा उघडायची. एखाद्या रात्री दोघीही रूमवर असताना हा प्रकार व्हायचा आणि ती दरवाजा उघडून पहायची. समोर कुणीच दिसत नसे. या आणि बऱ्याच अशा घटनांकडे दुर्लक्ष करून दोघींनी तिथे सहा महिने कसेतरी काढले आणि नंतर राहण्यासाठी दुसऱ्या जागेत गेल्या.
संध्याकाळी ८ वाजता जेवण – औषधे इत्यादी आटोपल्यावर तिचं पांघरूण बदलताना ती नर्स जवळ रोज एकच तक्रार करायची. “प्लीज ते पांघरूण व्यवस्थित घालून जा, ती मुलं फारच खोडकर आहेत, जिन्यावर धावत रहातात आणि रोज माझं पांघरूण काढून नेतात.” नर्स ओके, ओके असं म्हणून आपलं काम करून जायची.
आश्चर्याची गोष्ट एवढीच की रोज सकाळी ड्युटीवर आलेल्या नर्सला तिचं पांघरूण रुमच्या दुसऱ्या टोकाला अस्ताव्यस्त पडलेलं मिळायचं आणि रॅक वरची औषधे किंवा अन्य समान इकडे तिकडे पडलेलं असायचं. ज्यूली आल्या दिवसापासून वर जाईपर्यंत हा कार्यक्रम तिथे रोजच चालू असयचा आणि स्टाफ सुद्धा न चुकता नित्याची कामं करत रहायचा.
काही दिवस तसेच गेले. एके दिवशी हा कार्यक्रम असाच चालू होता शेवटी तो नेहमी प्रमाणे बोलला “व्हेअर आर यू मॉम, टेक मी होम”. एक दोन मिनिटांनी तो पुन्हा बोलला “माय मॉम इज कमिंग, माय मॉम इज कमिंग”
काही वेळ शांततेत गेला – कुणी काहीच बोललं नाही. सर्वजण आपापल्या कामात गर्क होते. अचानक खोलीतली एक खिडकी धडकन उघडली गेली आणि एक जोरदार थंड हवेची लहर आत आली. खोलीतल्या सर्वांच्याच अंगावर काटा आला. पुढे काय होणार आहे त्याची कल्पना त्या अनुभवी स्टाफला आली होती. पुन्हा एकदा क्रिसने आपले दोन्ही हात वर उचलले आणि लहान मुलाप्रमाणे ओरडला “मॉम, आय वॉज वेटिंग फॉर यु, आय वॉज वेटिंग फॉर यु, यु टुक सो लोंग, टेक मी विथ यु नाव” आणि पुढच्या क्षणी त्याने मान टाकली.
जणू काही घडलच नाही अशा प्रकारे सर्वजण पुन्हा कामात गढून गेले.
नुकत्याच अॅडमिट झालेल्या एका पेशंटच्या ड्युटीवर असताना तिला त्या खोलीत दोन तीन वेळा बाजूलाच एक काळी सावली असल्याचा भास झाला. काम आटोपून खोलीच्या बाहेर पडताना तर ती सावली पेशंटच्या डोक्याजवळ उभी असल्या सारखी वाटली. दुसऱ्या दिवशी सकाळी समजलं की तो पेशंट रात्री झोपेतच गेला.
दुसऱ्याच दिवशी आणखी एका पेशंटच्या बाबतीत असाच अनुभव आला. त्या खोलीतून बाहेर पडताना तिला अगोदरच समजलं होतं की या पेशंटला उद्याचा दिवस काही दिसणार नाही.
त्या नर्सिंग होमच्या बहुतेक सर्वच नर्सेसना असा अनुभव एकदातरी आलेला होता कारण तिथे मरणाच्या दारात असलेलेच पेशंट असायचे.
Patoli is a traditional sweet dish generally made during Ganesh festival. The wonderful blend of…
Black peas are probably not one of the most popular peas in the other parts…
Nachani also known as raagi is one of the most nutritious cereals. It is rich…
In Kokan, black pomfret (locally known as Saranga or Halwa in Mumbai) is one of…
Amboli is a special type of rice bread made in Malvan. It can be considered…
‘Khadkhade’ is very interesting name for a dish and it depicts a mixture of things…
Leave a Comment